हिंदुत्व हा सर्वसमावेशक विचार : भैय्याजी जोशी
पुसदमधील केशव स्मृती भवनाचे लोकार्पण पुसद, २२ जानेवारी : संघाने समाजाला एक चेहरा दिला आहे. हिंदू म्हणजे कोण हे संघाने जगाला सांगण्याचे कार्य केले आहे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भूमिका मनात बाळगून संघाचे कार्य अखंड, अविरत सुरू आहे. बदलत्या भारतात मूक साक्षी होण्यापेक्षा, सक्रिय साक्षी होणे आणि भारताला सुपर पॉवर बनवण्यापेक्षा सुपर राष्ट्र बनवणे,
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
पर्पल जल्लोष 2025 चा समारोप उत्साहात पुणे दि. 19 : ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळविण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पांबाबत कार्यशाळा संपन्न पुणे, दि. 17 : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 25 वर्षे लागू शकतील असे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याच्या
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना
शासकीय, खासगी आस्थापनांना महिलांची लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध कायद्यांतर्गत समिती स्थापन करण्याचे आवाहन
पुणे, दि. १७ : दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या शासकीय, खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ
बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्र माळेगाव
सेवा भवन प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ मॅरेथॉनचे आयोजन
पुणे – ‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून या मॅरेथॉनला प्रारंभ होईल. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन बारामती, दि.१५ : गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा अतिशय दिमाखदार, जोशपूर्ण व क्रीडामय वातावरणात २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी
राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पुणे, दि. १२: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे
भारताला ‘विश्वगुरू’च्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ संस्कृतीची आवश्यकता : राहुल सोलापूरकर
कोथरूड मध्ये ३५ व्या ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेला’ उत्तम प्रतिसाद पुणे दि. १० जानेवारी : भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य विचार सोडून आपली संस्कृती आणि परंपरा कशी विज्ञाननिष्ठ आहे हे लोकांना षड्-दर्शनाच्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ हिंदू संस्कृतीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य आणि सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

