गलवान चकमकीनंतरही चीनने दोनदा केला होता हल्ल्याचा प्रयत्न
जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत व चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतरही तब्बल दोन वेळा चीनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जागरूक भारतीय सैन्याने तो प्रयत्न हाणून पाडला आणि आपल्या सीमेचे रक्षण केले. नुकताच झालेल्या एका सैन्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ही बाब समोर आली. अर्थात याबाबत सैन्य अथवा संरक्षण मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले
मुख्यमंत्र्यांचे झ्युरिकमध्ये जोरदार स्वागत, दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री दाखल
झुरीकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकताच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दाखल झाले आहेत. जागतिक आर्थिक परिषद २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आजपासून सुरु झाली आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचे आगमन होताच तेथील भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भल्या
सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम : नरेंद्र मोदी
समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम आहेत; त्यांचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलिकडे आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर होते. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स अर्थात एनएसीआयएनचे उद्घाटन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित
समानतेचा संदेश देणारे : शंकरदेव
शंकरदेव (१४४९-१५६९) ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी अलिपुखुरी नावाच्या छोट्या गावात इ. स. १४४९ मधे शंकरदेवांचा जन्म झाला. त्या काळात आसाममधील लोकस्थिती अत्यंत अवनत दशेला पोहोचली होती. तिथं छुतिया, कचारी, भूयान/भुइया, आहोम असे चार राजवंश सत्ता गाजवत होते. त्यांच्या आपसातील यादवीमुळे आसामी जीवन दोलायमान झालं होतं. एकीकडे राज्यकर्त्यांचा जुलूम शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे परस्परविरोधी आचारविचार सांगणाऱ्या
वैष्णव परंपरेतील द्वैत वेदान्त मताचे प्रवर्तक : मध्वाचार्य
मध्वाचार्य (११९९-१२९४) कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडुपीपासून आठ मैलांवर असणाऱ्या पाजक नावाच्या क्षेत्री अश्विन शुद्ध दशमीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या काळाबद्दल मतभेद आहेत. पण सर्वसामान्यपणे इ.स. ११९९ ते १२९४ असा त्यांचा काळ मानला जातो. आईवडिलांनी त्यांचं नाव वासुदेव असं ठेवलं होतं. त्याचं व्युत्पत्तिकौशल्य इतकं विलक्षण होतं की, या जोरावर अनेक श्लोकांचा व शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या
महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक : चक्रधर स्वामी
चक्रधर स्वामी (११९४-१२७४) महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड आहे. या काळात महाराष्ट्रात नाथ, वारकरी, महानुभाव, लिंगायत इ. धार्मिक संप्रदायांचा उदय झाला. अनेक सिद्ध सत्पुरुष महाराष्ट्रात उदयास आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात फार मोलाची भर घातली. त्यामध्ये महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे. चक्रधर स्वामींचा कार्यकाल तेराव्या शतकातला आहे. चक्रधर स्वामी
मोक्षाचा खरा मार्ग ज्ञान व कर्म यांपेक्षा भक्तीचाच आहे असं सांगणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामानुजाचार्य
रामानुजाचार्य (१०१७-११३७) रामानुजांचा जन्म इ. स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील चिंगलपेठ जिल्ह्यातील श्रीपेरेंबुदूर इथे झाला. जीव आणि जग हे दोन्ही सत्य मानणाऱ्या द्वैतवादाचा पुरस्कार करून रामानुजाचार्यांनी वैष्णव धर्माची ध्वजा सर्वदूर पसरवली. दक्षिणेमध्ये आपल्या सर्वसमावशेक भक्तिसंप्रदायाला आदराचं स्थान मिळवून दिलं. अमोघ वक्तृत्व, अफाट विद्वत्ता आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत विचारधारेचा प्रतिकूल स्थितीतही निष्ठेने प्रचार केला व
रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती
मुंबई, ४ जानेवारी – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होणार आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या गेल्या दोन वर्षांत चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र नंतर ते गुन्हे रद्द करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री
गृहमंत्र्यांनी घेतला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा
नवी दिल्ली, ३ जानेवारी – जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला असला तरीही नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजगपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी काल बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहशतवाद्यांच्या संपूर्ण इको सिस्टीमचे कंबरडे मोडण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब करून कठोर
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 2 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी मदत

