संगमनेर शहरातील १४ बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त
शिवशंकर स्वामी यांच्या अथक प्रयत्नांना आले यश संगमनेर (अहिल्यानगर), दि. १६ फेब्रुवारी : संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ उध्वस्त करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून गोसेवक प्रशासनाचा पाठपुरावा करत होते. त्यासाठी २८ जानेवारीपासून मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन लेखी
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव
नागपूर, १४ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टतर्फे आयोजित ‘राजरत्न पुरस्कार सोहळा – 2026’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे
हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पुणे, दि. १५ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्थानकामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहर भाजप अध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पुणे शहर
जळगावात रंगणार पाचवा देवगिरी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव
२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी | चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती जळगाव, १३ फेब्रुवारी : चित्रपट क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या युवकांना हक्काचे व्यासपीठ म्हणून अजिंठा फिल्म सोसायटीद्वारा प्रतिवर्षी आयोजित होणारा देवगिरी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव यंदा कान्ह ललित कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ दरम्यान जळगाव येथील मु.जे.महाविद्यालय परिसरातील कान्ह ललित
छत्रपती संभाजीनगर शहरात रंगणार तीन दिवसीय ‘साहित्य उत्सव’
प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती तर्फे “जीवन गौरव पुरस्काराने“ सन्मानित करण्यात येणार छत्रपती संभाजीनगर, दि. १४ फेब्रुवारी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्योत्सवात विविध विषयांवर चर्चासत्रे, कवीसंमेलन, नाट्यछटा सादरीकरण असे
समाजपरिवर्तनाचे वैयक्तिक यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत : अतुल लिमये
जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान पुणे, दि. १४ फेब्रुवारी : “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. शासनावर अवलंबून न राहता काम उभे करणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच
लव जिहाद विरोधात कडक कायदा करा, पुण्यातील मुलींची सरकारला कळकळीची विनंती
लव्ह जिहाद / धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे, दि. १३ फेब्रुवारी : सध्या अनेक राज्यांनी इस्लाम धर्माची बदलती लोकसंख्या लक्षात घेऊन वेळीच यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश व गुजराथ राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे लागू केले आहेत. यात फसवून धर्मांतरण करणे, लग्नाचे आमिष दाखवून, धमकावून किंवा चुकीची माहिती देऊन
गुणवत्तावान समाजातूनच राष्ट्र बलशाली बनते : डॉ. मोहन भागवत
जऊळके येथे शिक्षण संस्थाचालकांशी संवाद; संवेदनशील माणूस घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट जऊळके (ता. दिंडोरी), १० फेब्रुवारी : “संवेदनशील माणूस घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणातूनच गुणवत्तावान समाज निर्माण होतो आणि असा प्रगल्भ समाजच राष्ट्राला बलशाली बनवतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपजीविका म्हणून नव्हे, तर आत्मीयतेने या पवित्र कार्यात झोकून दिले पाहिजे,” असे प्रतिपादन
धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण : डॉ. मोहन भागवत
चांदवड तालुक्यातील णमोकार येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळा विविधतेत एकता हेच भारताचे बलस्थान मळसाणे (जि. नाशिक), दि. १० : “धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल,” असे प्रतिपादन
पुणेकरांसाठी सुवार्ता; पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता !
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत निर्णयाचे केले स्वागत मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली असून या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुणे आणि

