इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात; अजित पवार यांचे स्वप्न साकार

रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय मुंबई, दि. १० फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला आज नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग

Read More

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मिळणार गती, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले आहे. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी असणार आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत

Read More

सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार, अजितदादांच्या आठवणीत कुटुंबीय भावुक

मुंबई, दि. १० फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभारही त्यांनी स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन

Read More

राज्यात लवकरच 70 हजार पदांची मेगा नोकरभरती; कौशल्याधारित व पारदर्शक डिजिटल भरती

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारणेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीची प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरुपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. राज्यात जवळपास 70,000 हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा

Read More

राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत (गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजीनियरिंग 2.0) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीत म्हणाले की, महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जीपीआर 2.0’च्या माध्यमातून प्रशासकीय

Read More

तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प – महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तौरल इंडिया-सुपा प्लांट’चे भव्य उदघाटन पारनेर (अहिल्यानगर), दि. 8 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे ‘तौरल इंडिया-सुपा प्लांटचे’ उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन

Read More

‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक ब्रँड बनविणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद; वेलनेस, स्टार्टअप्स व जागतिक गुंतवणुकीचा संगम मुंबई. दि. ५ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक

Read More

आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नये : एकनाथ शिंदे

सोलापूर जिल्ह्यातील सभेत एकनाथ शिंदेंची गर्जना वळसंग (जि. सोलापूर), दि. ४ फेब्रुवारी : इथे कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये. कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. जिल्हा

Read More

अजितदादांच्या अपघातामागील सत्य नेमके काय?

(सदर लेख समाजमाध्यमांवर प्रसारित झालेला आहे. समाजमाध्यमांवरील तपशीलांप्रमाणे या लेखाचा लेखक अज्ञात आहे. तरी स्वबोध या लेखाची कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. मात्र लेख माहितीपर असल्यामुळे येथे प्रकाशित केला जात आहे.) सर्व काही जळून खाक झाले असतानाही विमानातली कागद कशी जळाली नाहीत ? कारण… जेव्हा विमान (Learjet 45) जमिनीवर आदळले, तेव्हा इंधनाच्या टाकीचा स्फोट होण्यापूर्वीच आघाताचा

Read More

स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा : फडणवीस

हरिद्वार, दि. ४ फेब्रुवारी : स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांच्या कार्याचा गौरव केला. फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते.

Read More