महाराष्ट्र राज्य
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमास उद्योजकांचा मोठा प्रतिसाद
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : उद्योगमंत्री उदय सामंत पुणे, दि. २९ : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
सोलापूर, दिनांक २४ : राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 282.75 कोटी निधी असलेली विविध कामे, 34 कोटी 68 लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्ते कामांचा समावेश आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा
गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ
सेवा वस्तीतील ३१ जोडप्यांनी केली गणपतीची सपत्नीक आरती
पुणे, दि. १९ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त पुणे महानगरातील सर्व भागातील सेवा वस्तीतील ३१ नागरिकांनी सपत्नीक समरसता आरती केली. महानगर समरसता गतिविधीच्या माध्यमातून या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा, मंडई, केसरीवाडा, दगडूशेठ हलवाई, गुरुजी तालीम या मंडळांमध्ये ‘आरती समरसतेची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुमठेकर रोड वरील ऐतिहासिक वारसा असलेल्या विंचूरकर वाड्यातील गणपती
संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा शहरात सामाजिक संवाद मेळावा संपन्न
सातारा, दि. १५ सप्टेंबर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने समाजातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” सातारा मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय तसेच अन्याय अत्याचारच्या विविध घटना, घडामोडी, शासकीय
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. ९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात
खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरसंघचालकांच्या हस्ते वेद सेवकांचा सन्मान पुणे : “परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि
आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे : सुनील आंबेकर
देवर्षी नारद पुरस्कार प्रदान सोहळा पुणे – पाश्चिमात्य लोकांनी आपापल्या अनुभवांच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्विकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीत सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा
परभणी, दि. 18 : बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार 18 ऑगस्ट रोजी परभणीत शनिवार बाजार मैदानावरुन दुपारी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला असून बांग्लादेशातील अनेक हिंदु बांधव, भगिनीवर अमानुष आत्याचार तसेच हिंदु मंदीरावर हल्ले होत असुन हिंदु देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात

