बातम्या
देशभरातून भारतरत्न नानाजी देशमुख यांना वाहिली गेली आदरांजली
पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व समाजासाठी अर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांची आज जयंती. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे स्मरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी
भारत-फ्रान्स डिजिटल तंत्रज्ञान सहकार्य वाढणार
भारत आणि फ्रान्स यांच्यातील डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचे अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील डिजिटल क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. अधिक तपशील या सामंजस्य कराराचा
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय, विश्वचषकात दिली विजयी सलामी
विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत केवळ १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजा याने ३ बाद केले तर जस्मित बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. भारतीय संघासाठी हे आव्हान खूपच सोपे ठरले व ४१ षटकं
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची 9 वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडीओ कार्यक्रमाला आज 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मन की बात मध्ये समाविष्ट असलेल्या काही महत्वपूर्ण संकल्पना आणि त्यांचा सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकणारा अभ्यास सामायिक केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयआयएम बेंगळुरू यांनी केलेल्या संशोधन कार्यात पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 105 भागांच्या
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री
राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई, दि. २६: स्वच्छता अभियान ही ‘लोकचळवळ’ झाली पाहिजे, हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा या राज्य सरकारच्या उपक्रमाचा
५३ वा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना जाहीर
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२१या वर्षांसाठी हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती
भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे तुमचे सामूहिक ध्येय आहे: राष्ट्रपती मुर्मू
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2021 च्या तुकडीतील 182 अधिकार्यांच्या गटाने, आज (25 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. या अधिकार्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या
मुख्य पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून आनंद – पंतप्रधान
गोव्यातील अगुआडा किल्ल्यावर भारतीय दीपगृह महोत्सवाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त प्रमुख पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून मला आनंद होत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या X वरील मनोगताच्या मालिकेत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद .
दीनदयाळजींचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत – नरेंद्र मोदी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दलही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. एका X पोस्टमध्ये
धनगर आरक्षणासाठी साताऱ्यातील तरुणांचे उपोषण स्थगित, पडळकरांची मध्यस्थी यशस्वी
गेल्या सहा दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी साताऱ्यातील दहिवडी या गावी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलेला असतानाच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेही डोके वर काढले आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत मात्र धनगर आरक्षण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी

