महाराष्ट्र राज्य
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला मिळणार गती, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज देखील मंजूर करण्यात आले आहे. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी असणार आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत
सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार, अजितदादांच्या आठवणीत कुटुंबीय भावुक
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभारही त्यांनी स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन
राज्यात लवकरच 70 हजार पदांची मेगा नोकरभरती; कौशल्याधारित व पारदर्शक डिजिटल भरती
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारणेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीची प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरुपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले. राज्यात जवळपास 70,000 हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा
राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत (गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजीनियरिंग 2.0) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीत म्हणाले की, महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जीपीआर 2.0’च्या माध्यमातून प्रशासकीय
तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प – महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तौरल इंडिया-सुपा प्लांट’चे भव्य उदघाटन पारनेर (अहिल्यानगर), दि. 8 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे ‘तौरल इंडिया-सुपा प्लांटचे’ उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन
आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नये : एकनाथ शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील सभेत एकनाथ शिंदेंची गर्जना वळसंग (जि. सोलापूर), दि. ४ फेब्रुवारी : इथे कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये. कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. जिल्हा
दादा लाड, भारतभूषणदास महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर
पुणे, ४ फेब्रुवारी : शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा.
महायुती सरकारचे लोकहितकारी निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा : रवींद्र चव्हाण
सातारा, दि. २ फेब्रुवारी : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कराड येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षातर्फे आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. मोदी सरकारने आणि भाजपा-महायुती सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, राज्यातील १३९ बस फेऱ्या रद्द
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६
पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. पुणे शहर व परिसरातील वेगवान औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि गुंतवणूक आकर्षण लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) कालमर्यादेत भूसंपादन, निधी

