महाराष्ट्र राज्य
दादा लाड, भारतभूषणदास महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर
पुणे, ४ फेब्रुवारी : शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा.
महायुती सरकारचे लोकहितकारी निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा : रवींद्र चव्हाण
सातारा, दि. २ फेब्रुवारी : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कराड येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षातर्फे आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. मोदी सरकारने आणि भाजपा-महायुती सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, राज्यातील १३९ बस फेऱ्या रद्द
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६
पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. पुणे शहर व परिसरातील वेगवान औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि गुंतवणूक आकर्षण लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) कालमर्यादेत भूसंपादन, निधी
राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. राज्यात पायाभूत सुविधा तसेच
हरित महाराष्ट्रासाठी येत्या ५ वर्षांत राज्यात लावले जाणार ३00 कोटी वृक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरणा’च्या स्थापने संदर्भात बैठक पार पडली मुंबई, दि. २ फेब्रुवारी : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात
विकसित भारताचे दमदार बजेट : मुख्यमंत्री
मुंबई, १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे. या अर्थसंकल्पाद्वारे देशातील विविध क्षेत्रांना पुढील काही वर्षे दिशा, गती व निधी
YoFiMa शिष्यवृत्ती चा निकाल जाहीर
५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दरम्यान जळगावात होणार विशेष स्क्रीनिंग जळगांव, दि. २ फेब्रुवारी : खान्देश मराठवाडा परिक्षेत्रातील युवकांकडे चित्रपट निर्मितीचे कौशल्य असुनही अनेकदा आर्थिक अडचणींमुळे चांगल्या चित्रकृती रसिकांपर्यंत पोचवता येत नाही म्हणून अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधना द्वारा खान्देश-मराठवाडा भागातील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मींसाठी YoFiMa अर्थात Young Film Makers
स्व. दादा रत्नपारखी यांचे जीवन हिच संघकामाची प्रेरणा : शरद ढोले
मार्तंड ते तापहिन स्मृतिग्रंथाचे प्रकाशन नाशिक, ३ फेब्रुवारी : जेष्ठ संघ कार्यकर्ते कै. दादासाहेब रत्नपारखी हे शांतीब्रम्ह होते. त्यांची दाहकता नव्हती तर त्याच्यातील समर्पण, साधेपणा, आत्मियता, प्रसिध्दीपराङ्मुखता या सगळ्यात ते मार्तंड होते. आपल्या ७५ वर्षाच्या संघकार्यपध्दतीत त्यांनी ‘संघ’ कसा जगायचा याचा आदर्श वस्तूपाठ सर्वांसमोर घालून दिला असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अ. भा. धर्मजागरण समन्वय
हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात भाविकांची अलोट गर्दी
“बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

