राष्ट्रीय
देशाची एकजूट दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढ्याचा आधार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, २७ एप्रिल : “देशाची एकता आणि १४० कोटी भारतीयांची एकजूट हीच दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या
भारताचे पाकिस्तानविरोधात कठोर राजनैतिक पाऊल : सिंधू करार स्थगित, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली, 23 एप्रिल : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक राजनैतिक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (CCS) बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानुसार, 1960 मधील सिंधू पाणी करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला असून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना 48 तासांत देश
पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी
बांगड्या पाहून धर्म विचारला आणि सुरू केला गोळीबार; पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईचे संकेत श्रीनगर, २२ एप्रिल : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी जिहादी दहशतवाद्यांनी एक भयावह हल्ला घडवून आणला. या गोळीबारात देशभरातून आलेल्या २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे २.४७ च्या
शताब्दी वर्षात संघाचा विस्तार, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय पुनर्जागरणावर भर
बेंगळुरू, २३ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात संघाच्या कार्याचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी सांगितले. बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या १०० वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात संघ
रा.स्व.संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 21 मार्चपासून बेंगळुरू येथे होणार
दिल्ली, दि. ५ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 21, 22 आणि 23 मार्च 2025 रोजी बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. बैठकीत 2024-25 चे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक
जनजाती समाजाशिवाय महाकुंभ पूर्ण होणार नाही
कल्याण आश्रमद्वारे आयोजित युवा कुंभात स्वामी अवधेशानंद जी यांचे विचार प्रयागराज, दि. ६ फेब्रुवारी : जसे आपण सर्व जनजाती बांधव आपली रूढी, परंपरा, संस्कृती सोबत घेऊन सहजतेने महाकुंभात आले आहात, त्याचप्रमाणे संतांनीही वन जीवनाची निर्मलता व साधेपणा अनुभवण्यासाठी वारंवार वनांमध्ये जावे लागेल. जनजाती समाजाशी समरसता साधल्या शिवाय सनातन संस्कृतीचे हे महाकुंभ पूर्ण होणार नाही,
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
नवी दिल्ली 2 : राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो. हे प्रयत्न लोकांच्या जीवनात
भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल – डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास
पुणे, ता. १९ : सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ शकतो ही जगाची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो. यासाठी भारतीयांना आपल्या गुणांचा किमान स्तर निर्माण करून तसे आचरण करावे लागेल. असे केल्यास विश्व गुरूचे स्थान आपण येत्या २० वर्षात
“गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” – दिनेश उपाध्याय
पुणे: “गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गोरक्षा आयाम आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना दिनेश उपाध्याय बोलत होते. क्षेत्र गोरक्षा संघटन
“चाईल्ड पोर्नोग्राफी” पाहणे पोक्सो अंतर्गत गुन्हा – सर्वोच्च न्यायालय
ठाणे, 28 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, “चाईल्ड पोर्नोग्राफी” डाऊनलोड करणे, पाहणे किंवा बाळगणे, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरतो. बालकांचे लैंगिक शोषण ही एक गंभीर विकृती आहे, जी भारतासह संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. मद्रास उच्च

