राष्ट्रीय
सेवा भारतीतर्फे वायनाडमध्ये बचावकार्य
आपत्कालीन मदतीपासून ते अत्यंसंस्कारापर्यंत स्वयंसेवकांची मदत मदत कार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान पुणे : केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना
छोटे शेतकरी हेच भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद – पंतप्रधान
तब्बल 65 वर्षांच्या कालखंडानंतर भारतात प्रथमच कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देशभरातील 120 दशलक्ष शेतकरी, 30 दशलक्षाहून अधिक महिला शेतकरी, 30 दशलक्ष मच्छिमार, 80 दशलक्ष पशुपालक यांच्या वतीने पंतप्रधानांनी केले प्रतिनिधींचे स्वागत नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : कृषी क्षेत्र हे भारताच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे. भारतात छोट्या शेतकऱ्यांचे प्रमाणे 90 टक्के आहे, त्यांच्याकडची शेतजमीन
छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे
छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे
सामुहिक प्रयत्नांतूनच भारत एक जागतिक नेतृत्व बनेल : डॉ. मोहन भागवत
एम्स ऋषिकेशमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्राम सदनाचे उद्घाटन ऋषिकेश (उत्तराखंड), दि. ३ जुलै : राष्ट्रहितासाठी सेवा कार्य करणे आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाजवळील माधव सेवा विश्राम सदनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन
भारताचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली, २७ जून : भारताचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक खालावली आहे. काल रात्री त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. वार्धक्यातून उत्पन्न झालेल्या आरोग्यसमस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत
आणीबाणी लागू केल्याने जगातील सर्वात मोठी लोकशाही झाकोळल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (सीईएल) च्या सुवर्ण महोत्सवी समारंभात उपराष्ट्रपतींचे भाषण सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला मिनीरत्न दर्जा बहाल नवी दिल्ली, २६ जून : १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही झाकोळली असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले. आणीबाणीच्या काळ्या दिवसांचे स्मरण करताना आणीबाणीचे दिवस पुन्हा कधीही अनुभवावे लागणार नाहीत कारण भारतात घटनात्मक लोकशाही
ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान
नवी दिल्ली, २६ जून : ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी त्यांचे नाव सुचवले. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची या पदासाठी निवड झाली. शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी
अरुणाचल प्रदेश: इटानगरमध्ये ढगफुटी, घरे आणि वाहनांचे नुकसान झाले
ढगफुटीमुळे अरुणाचल प्रदेशच्या इटानगर शहरातील अनेक भागात रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामुळे असंख्य घरे व वाहने खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेशच्या राजधानीचे शहर असलेल्या इटानगरमध्ये भूस्खलनाच्या घटनांमुळे वाहने आणि निवासी परिसर प्रभावित झाला आहे. विपरीत हवामान परिस्थितीमध्ये स्थानिक रहिवाशांना जागरूक आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. अधिकारी
धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्यांचे रक्षण करणे म्हणजेच राष्ट्रकार्य : भैय्याजी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या सेविकांना मार्गदर्शन नाशिक : धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्य यांचे रक्षण करणे महणजेच राष्ट्रकार्य होय. “रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग” असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.त्यामुळे आपण कठोर बनून थोडा वेळ हा राष्ट्रकार्यासाठी राखून ठेवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी येथे केले. राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसाठी
न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी घेतली लोकपाल पदाची शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे काल सायंकाळी ६ वाजता आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांना लोकपाल पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी भारताच्या लोकपालचा पदभार स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश

