राष्ट्रीय
शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प ! मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या
सकारात्मक विचारातून मिळणारी ऊर्जा तरुणांसाठी सर्वात मोठे भांडवल : शांताकुमारी
गाझियाबाद, दि. 22 फेब्रुवारी : स्वावलंबी, निर्भय,आत्मविश्वासू आणि चारित्र्यसंपन्न युवा हे कोणत्याही राष्ट्राची अमूल्य धरोहर असतात. तसेच ज्याच्यात उत्साह आणि विवेक यांचा समतोल आहे तोच खरा युवा आहे. सकारात्मक विचारातून मिळणारी ऊर्जा ही तरुणांसाठी सर्वात मोठी भांडवल असते. अशा व्यक्तींचा निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असे राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांनी म्हटले
संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा हरियाणामध्ये
संघशताब्दी निमित्त आगामी वर्षभराच्या नियोजनावर होणार मंथन नवी दिल्ली, दि. 24 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’चे आयोजन यावर्षी हरियाणातील समालखा येथे करण्यात आले आहे. 13, 14 आणि 15 मार्च 2026 रोजी पट्टीकल्याणा येथील ग्रामविकास आणि सेवा साधना केंद्रात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
धर्मांतराविरोधातील ग्रामसभांचा निर्णय संवैधानिक, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
जनजाती परंपरांच्या संरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब जनजाती हितरक्षणासाठी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नांना बळ नाशिक, दि. 24 फेब्रुवारी : सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या निर्णयाचे जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले आहे. जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सचिव शरद केळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिग्बल
AI फॉर ॲग्रीकल्चर हा आधुनिक शेतीचा नवा अध्याय : देवेंद्र फडणवीस
‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर मुख्यमंत्र्यांचा संवाद नवी दिल्ली, दि. २० फेब्रुवारी : जगभरातील अन्नसाखळीवर वाढता ताण, हवामान बदलाचे गंभीर परिणाम, पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक आहे. अनेक देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि
ज्ञान हे दडपून टाकण्याचे ‘शस्त्र’ नाही तर सर्वांना सुखी करणारे ‘शास्त्र’ : जे. नंदकुमार
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान पुणे, दि. 17 फेब्रुवारी : “पाश्चात्य परंपरेत इतरांना दडपून टाकण्यासाठी शस्त्र म्हणून ज्ञानाचा विचार केला जातो. भारतीय परंपरेत मात्र प्रत्येक व्यक्तीला श्रेष्ठ, सुखी, संपन्न, निरामय बनवण्यासाठीचे शास्त्र म्हणून ज्ञानाकडे बघितले जाते. आपल्या परंपरेत ज्ञान लादले जात नाही तर व्यक्तीच्या ठायी असलेल्या ज्ञानाची जाणीव त्याचा करून दिली जाते,
स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा : फडणवीस
हरिद्वार, दि. ४ फेब्रुवारी : स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांच्या कार्याचा गौरव केला. फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते.
विकसित भारताचे दमदार बजेट : मुख्यमंत्री
मुंबई, १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे. या अर्थसंकल्पाद्वारे देशातील विविध क्षेत्रांना पुढील काही वर्षे दिशा, गती व निधी
सरकारकडून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, किसान संघ अर्थसंकल्पावर असमाधानी
सरकारची शेतकरी हिताची भूमिका अर्थसंकल्पात प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही – भारतीय किसान संघ सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, किसान संघाचा आरोप नवी दिल्ली, दि. १ फेब्रुवारी : शेतकरी हितासंबंधी केंद्र सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये अतंर दिसत असून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन
निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहितासाठी केलेले कार्य संघाचेच कार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
राजकोट, १९ जानेवारी: “जेव्हा युवक विविध क्षेत्रांत देशासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘देश काय आहे’ याची स्पष्ट कल्पना असायला हवी. भूतकाळात या स्पष्ट विचारांच्या अभावामुळे किंवा ते विचार पुसट झाल्यामुळेच देश गुलाम झाला होता. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजकोट येथील सेवा भारती भवनमध्ये सौराष्ट्र-कच्छमधील युवकांशी संवाद साधला.

