भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता सोहळ्याचे आयोजन, भैय्याजी जोशी राहणार उपस्थित
भय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता समारोह पुणे, दि. २४ नोव्हेंबर : पूर्वोत्तर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी जीवन समर्पित करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत भैय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २९ नोव्हेंबरला (शनिवारी) होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात सायंकाळी ५
‘पंढरपूर ते घुमान’ सायकल वारीचे प्रस्थान
सायकल वारी आज नाशिक मुक्कामी पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे
महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’!
मुंबई, दि. २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली. मसुदा सल्लागार समितीने यावेळी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता दिली असून हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा 3 टप्प्यांतील
जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द
विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”
जातीच्या चुकीच्या नोंदींमुळे होलार समाजाचे नुकसान : ॲड. एकनाथ जावीर
पुणे, दि. १३ ऑक्टोबर : अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने उद्योजकता मेळावा पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर सामाजिक समरसता मंचाचे प्रांत प्रमुख डॉ. रमेश पांडव, समाज नेते ॲड. एकनाथ जावीर, संघटक ज्ञानेश्वर जावीर, राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील भंडगे आदी उपस्थित होते. डॉ. कांबळे यांच्या
शाश्वत शेतीचा अवलंब देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो – पंतप्रधान
नवी दिल्ली, दि. १२ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी
भारत-ब्रिटन वाढत्या भागीदारीतून एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई, 9 ऑक्टोबर : भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास हाच दोन्ही देशांच्या संबंधांचा पाया आहे. संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षण आणि नवसंशोधनापर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आणि ब्रिटन संबंधांमध्ये भर पडत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या
जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध शक्य : प्रवीण दीक्षित
पुणे, दि. ७ ऑक्टोबर : माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे
समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज
भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख

