हरित महाराष्ट्रासाठी येत्या ५ वर्षांत राज्यात लावले जाणार ३00 कोटी वृक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरणा’च्या स्थापने संदर्भात बैठक पार पडली मुंबई, दि. २ फेब्रुवारी : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात
विकसित भारताचे दमदार बजेट : मुख्यमंत्री
मुंबई, १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे. या अर्थसंकल्पाद्वारे देशातील विविध क्षेत्रांना पुढील काही वर्षे दिशा, गती व निधी
YoFiMa शिष्यवृत्ती चा निकाल जाहीर
५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दरम्यान जळगावात होणार विशेष स्क्रीनिंग जळगांव, दि. २ फेब्रुवारी : खान्देश मराठवाडा परिक्षेत्रातील युवकांकडे चित्रपट निर्मितीचे कौशल्य असुनही अनेकदा आर्थिक अडचणींमुळे चांगल्या चित्रकृती रसिकांपर्यंत पोचवता येत नाही म्हणून अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधना द्वारा खान्देश-मराठवाडा भागातील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मींसाठी YoFiMa अर्थात Young Film Makers
स्व. दादा रत्नपारखी यांचे जीवन हिच संघकामाची प्रेरणा : शरद ढोले
मार्तंड ते तापहिन स्मृतिग्रंथाचे प्रकाशन नाशिक, ३ फेब्रुवारी : जेष्ठ संघ कार्यकर्ते कै. दादासाहेब रत्नपारखी हे शांतीब्रम्ह होते. त्यांची दाहकता नव्हती तर त्याच्यातील समर्पण, साधेपणा, आत्मियता, प्रसिध्दीपराङ्मुखता या सगळ्यात ते मार्तंड होते. आपल्या ७५ वर्षाच्या संघकार्यपध्दतीत त्यांनी ‘संघ’ कसा जगायचा याचा आदर्श वस्तूपाठ सर्वांसमोर घालून दिला असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अ. भा. धर्मजागरण समन्वय
सरकारकडून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, किसान संघ अर्थसंकल्पावर असमाधानी
सरकारची शेतकरी हिताची भूमिका अर्थसंकल्पात प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही – भारतीय किसान संघ सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक, किसान संघाचा आरोप नवी दिल्ली, दि. १ फेब्रुवारी : शेतकरी हितासंबंधी केंद्र सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये अतंर दिसत असून लहान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन
हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात भाविकांची अलोट गर्दी
“बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.
गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानातून धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाची प्रेरणा : मुख्यमंत्री
नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरुतेगबहादुर साहिबजी यांचा 350 वा ऐतिहासिक शहीदी समागम संपन्न नांदेड, २५ जानेवारी २०२६ : गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहाद्दुर यांचे पुण्यस्मरण केले. शिख पंथाचे
भारत समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा समजून घ्यावी लागेल : भैय्याजी जोशी
संस्कृतशिवाय भारतीयत्व अपूर्ण : भैय्याजी जोशी संस्कृत भाषेतील १० पुस्तकांचे प्रकाशन पुणे, दिनांक २२ जानेवारी २०२६ : भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी
तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरावे, त्याचे गुलाम होता कामा नये : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
छत्रपती संभाजीनगर येथे युवा उद्यमींशी झालेल्या संवादात सरसंघचालकांचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर : “तंत्रज्ञान ही अपरिहार्य गोष्ट आहे. स्वदेशीचा वापर म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे असे नाही. परंतु आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. आपण उद्योग केवळ आपल्या नफ्यासाठी नाही, समाजाच्या भल्यासाठी करतो” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते युवा उद्यमी संवाद
निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहितासाठी केलेले कार्य संघाचेच कार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
राजकोट, १९ जानेवारी: “जेव्हा युवक विविध क्षेत्रांत देशासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘देश काय आहे’ याची स्पष्ट कल्पना असायला हवी. भूतकाळात या स्पष्ट विचारांच्या अभावामुळे किंवा ते विचार पुसट झाल्यामुळेच देश गुलाम झाला होता. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजकोट येथील सेवा भारती भवनमध्ये सौराष्ट्र-कच्छमधील युवकांशी संवाद साधला.

