महाराष्ट्र राज्य
त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक : डॉ. अनघा लवळेकर
‘नारी तू नारायणी’ परिषदेत महिलांच्या आत्मनिर्भरतेवर विचारमंथन पुणे दि. २१ – त्याग, पराक्रम आणि सेवा समाजघडणीसाठी आवश्यक आहे. महिलांमध्ये ऋजुता असते. त्यामुळे सेवेची प्रेरणा मुळातच त्यांच्या अंगी असते. संकल्प, सहृदयता, समय आणि सातत्य यांच्या आधारे स्त्रियांनी अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. समाजाच्या उत्थानासाठी पंचपरिवर्तानातील सर्व क्षेत्रात सेवा आवश्यक आहे आपण कृतीतून सर्वत्र पोहोचुया असा संदेश
संजय राऊत यांचा माफीनामा, दादा भुसेंनी मागे घेतला अब्रुनुकसानीचा दावा
गिरणा साखर कारखान्यातील शेअर होल्डर्स, शेतकरी बांधव तसेच सर्व मालेगावच्या जनतेची संजय राऊत यांनी मागितली माफी ! मालेगाव, दि. २२ फेब्रुवारी : दैनिक सामना मध्ये शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप शिवसेना आमदार व मंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. या बातमीमुळे मालेगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांमध्ये
AI फॉर ॲग्रीकल्चर हा आधुनिक शेतीचा नवा अध्याय : देवेंद्र फडणवीस
‘AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर मुख्यमंत्र्यांचा संवाद नवी दिल्ली, दि. २० फेब्रुवारी : जगभरातील अन्नसाखळीवर वाढता ताण, हवामान बदलाचे गंभीर परिणाम, पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक आहे. अनेक देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि
जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप!
मुंबई, 18 फेब्रुवारी : हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जागतिक व्यापार क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि पुरवठा साखळीच्या पुनर्रचनेच्या
जगद्गुरु अभंगगाथावन लोकचळवळ व्हावी : अतुल लिमये
देहू, दि. 17 फेब्रुवारी : वृक्षदाई प्रतिष्ठान निर्मित जगद्गुरु अभंगगाथावन महत्वपूर्ण उपक्रम असून गावोगावी असे अभंगवन, ज्ञानेश्वरीवन तयार झाले पाहिजेत, ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. श्रीक्षेत्र देहू येथील अभंगवनात वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे
शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच, विविध पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : राज्यभरात सध्या कोणतेही निवडणुकीचे वातावरण नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत राज्यभरातून इनकमिंग अद्याप सुरूच आहे. सामान्यपणे निवडणुकांच्या तोंडावर अशाप्रकारचे पक्षांतर पाहायला मिळते. मात्र कोणतीही निवडणूक नसतानाही हे इनकमिंग सुरूच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील विविध पक्षांच्ये नेते-कार्यकर्त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘मुंबई क्लायमेट वीक’ भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील विसावा क्र. २ चे लोकार्पण
पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २
ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या हाती भगवा, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या मुंबईतील निवासस्थानी
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक
पिंपरी चिंचवड, दि. १५ फेब्रुवारी : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बंजारा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने

