महाराष्ट्र राज्य
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय पुणे, दि. 2 मार्च : “महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास
दुबईत अडकलेले 111 नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले, उर्वरित 73 नागरिकांसाठी शर्थीचे प्रयत्न
पुणे, दि. 4 मार्च : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत सरकार
श्रीगुरू तेग बहादुर यांचा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणार : देवेंद्र फडणवीस
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी; मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची तेजस्वी आणि अमर गाथा! नवी मुंबई, दि. 1 मार्च : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजींनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपला धर्म व श्रद्धा टिकून राहिली आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास हा महाराष्ट्रातील सर्व घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने
राष्ट्रोत्थानासाठी शेवटच्या माणसापर्यंत संघ सक्रियपणे कार्य करत आहे : पांडुरंग बलकवडे
पुणे, दि. २ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून तळागाळात जाऊन काम करतोय. स्वातंत्र्य आंदोलनात संघाने सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच फाळणीनंतर सर्वांच्या पुनर्वसनासाठी संघाने मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने नुमवी प्रशालेत आयोजित हिंदू संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष
परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात संतांनी खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले : डॉ. कृष्ण गोपाल
पुणे, दिनांक २८ फेब्रुवारी : भक्ती चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची संधी दिली. परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनानेच खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले, असे मत भारतीय संतवाड़मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषदे’त
‘एआय’च्या माध्यमातून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमध्ये उद्घाटन नाशिक, दि. २७ फेब्रुवारी : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी एआयचा वापर करून लँग्वेज लॅब तयार करत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘महावितरण’ने उत्पन्नवाढीसाठी ‘IPO’ आणून ‘Corporate Governance’चा अंमल करावा : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 26 फेब्रुवारी : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. तसेच आपल्या कारभारात ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ अंमलात आणण्याचेही निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘महावितरण’ने उत्पन्नवाढीसाठी ‘आयपीओ’ आणून ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ची
छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा अभिमान शिकविला : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वभाषेचा अभिमान शिकविला. मराठी भाषा शुद्ध आणि प्रमाणित व्हावी यासाठी त्यांनी शब्दकोश निर्माण करून एक प्रमाण भाषा समाजाला दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या परंपरेतून मराठी भाषेची समृद्ध यात्रा आपल्याला अनुभवता येते. ‘लीळाचरित्र’सारख्या आद्य ग्रंथातून मराठी
भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महापारेषण सज्ज
मुंबई, दि. २६ फेब्रुवारी : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योग, व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेत, यासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर
मुंबई, दि. 25 फेब्रुवारी : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, 25 जानेवारी, 2026, रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पंचायत प्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सन 2024-25 वर्षाकरिता पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध केली; या मध्ये पाचव्या अनुसूचीअंतर्गत येणाऱ्या व पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू असणाऱ्या राज्यांमध्ये पेसा कायद्याच्या प्रभावी

