महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : केंद्राचे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून राज्य नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती शक्य होत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी सांगितले की, नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांत नवीन पोलीस चौक्या उभारून

Read More

पुणे महानगरातील 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींची मंजुरी : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : पुणे महानगर क्षेत्रातील 220 विकास प्रकल्पांना 32 हजार 523 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरांना आवश्यक सुविधा देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते विकास आराखडा ठरवल्यानंतरच शहर विकासाची रुपरेषा अंतिम करावी, असेही त्यांनी सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

Read More

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभे राहणार

बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नागपूर, दि. ११ डिसेंबर : राज्याचा 720 किमी समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन 2026 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सभागृहातील बैठकीत दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि वरिष्ठ

Read More

शताब्दी वर्षात संघ सर्वस्पर्शी व्हावा : सहसरकार्यवाह अतुल लिमये

नागपूर : संघ शताब्दी वर्षात असून, संघ कार्याची आगामी दिशा काय? तर संघ सर्वस्पर्शी झाला पाहिजे, या दृष्टीने कार्य करायचे आहे. व्यक्तीनिर्माण एका दिवसात होत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संघाच्या दृष्टीने वातावरण अनुकुल आहे, पण समाज परिवर्तनासाठी आचरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. आचरण सुधारत नाही, तोपर्यंत परिवर्तन स्थायी

Read More

पंचपरिवर्तनातून समाजपरिवर्तन होईल: अरविंद कुकडे

नागपूरच्या अयोध्या भागाच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टी नागपूर, 7 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रमात विदर्भ प्रांत सह–संपर्क प्रमुख अरविंद कुकडे यांनी समाज परिवर्तनासाठी ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. संघटनेच्या 100 वर्षांच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांनी संघाच्या विचारधारेचा स्वीकार करून एकात्मता, संस्कार आणि राष्ट्रीय भावनेची जपणूक करतानाच पंचपरिवर्तनाचे पालन केले

Read More

कार्यावरील विश्वासामुळेच संघाला भरभरून साहाय्य : शरद ढोले

धर्मजागरण विभागाच्या कार्यालयाचे पुण्यात भूमिपूजन पुणे, ४ डिसेंबर : समाजासाठी आणि देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे गेली शंभर वर्षे काम करत आहेत. या कार्यामुळेच संघाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामुळे समाज संघाला भरभरून साहाय्य करत आहे, असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण गतिविधीचे समन्वयक शरद ढोले यांनी केले. धर्मजागरण गतिविधीचे अखिल भारतीय

Read More

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार पुणे, दिनांक १ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात

Read More

पूरग्रस्तांसाठी ‘सेवा भारती’ने केलेले कार्य लक्षणीय : सुधीर कुमार

सेवा धर्म महान’ पुस्तिकेचे प्रकाशन पुणे, दि. १ डिसेंबर : कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना केली जाणारी मदत हे ‘सेवा भारती’च्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही ‘सेवा भारती’ने लक्षणीय कार्य केले, अशा शब्दात ‘सेवा भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री सुधीरकुमार यांनी ‘सेवा भारती’च्या कार्याचा गौरव केला. सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये ‘सेवा भारती’च्या वतीने

Read More

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

रायगड-अलिबाग, दि. २९ : आधुनिक काळात शिक्षकांना विद्यार्थी घडवणे आव्हानात्मक झाले आहे. आजची मुले स्मार्ट आहे त्यामुळे त्यांना शिकवताना शिक्षकांना अधिक स्मार्टनेस दाखवावा लागेल. मुलांना रागावण्याचे किंवा अपमानित करण्याचे युग गेले आहे, असे सांगताना शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. राज्यपाल देवव्रत यांचा

Read More

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले. संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केणेकर, आमदार प्रशांत बंब, ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके

Read More