विकसित भारताचा मार्ग महिला सक्षमीकरणातूनच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 मार्च : आपल्याला विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्याचा मार्ग महिला सक्षमीकरणातून जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. जगाच्या पाठीवर ज्या विकसित राष्ट्रांनी आपल्या नारीशक्तीची ताकद ओळखली, त्या राष्ट्रांच्या अर्थचक्राला गती प्राप्त झाली, त्यांचा विकास झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचे

Read More

पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव

पुणे, दि. ८ मार्च : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेर आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात आले. पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या या डबल डेकर उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून या पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे,

Read More

प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : मुख्यमंत्री

  नागपूर, दि. 7 मार्च : राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केली. मुख्यमंत्री

Read More

कल्याण लोकसभा मतदारसंघात आता वाहतूक व्यवस्थेचा नवा पॅटर्न

खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो कल्याण, दि. 3 मार्च : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य

Read More

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय पुणे, दि. 2 मार्च : “महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास

Read More

दुबईत अडकलेले 111 नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले, उर्वरित 73 नागरिकांसाठी शर्थीचे प्रयत्न

पुणे, दि. 4 मार्च : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत सरकार

Read More

श्रीगुरू तेग बहादुर यांचा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणार : देवेंद्र फडणवीस

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी; मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची तेजस्वी आणि अमर गाथा! नवी मुंबई, दि. 1 मार्च : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजींनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपला धर्म व श्रद्धा टिकून राहिली आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास हा महाराष्ट्रातील सर्व घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने

Read More

राष्ट्रोत्थानासाठी शेवटच्या माणसापर्यंत संघ सक्रियपणे कार्य करत आहे : पांडुरंग बलकवडे

पुणे, दि. २ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून तळागाळात जाऊन काम करतोय. स्वातंत्र्य आंदोलनात संघाने सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच फाळणीनंतर सर्वांच्या पुनर्वसनासाठी संघाने मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने नुमवी प्रशालेत आयोजित हिंदू संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष

Read More

परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात संतांनी खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले : डॉ. कृष्ण गोपाल

पुणे, दिनांक २८ फेब्रुवारी : भक्ती चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची संधी दिली. परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनानेच खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले, असे मत भारतीय संतवाड़मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषदे’त

Read More

‘एआय’च्या माध्यमातून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमध्ये उद्घाटन नाशिक, दि. २७ फेब्रुवारी : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी एआयचा वापर करून लँग्वेज लॅब तयार करत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More