महाराष्ट्र राज्य
ओबीसींच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या देशमुखांचा मोर्चा
राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय फायदा सर्वच राजकीय पक्ष उठवू पाहात आहेत. ओबीसी, मराठा, धनगर, कुणबी अशा विविध समाजघटकांनी आरक्षणासाठी मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. हजारोंनी समाजबांधव रस्त्यावर उतरत आहेत. स्वाभाविकच याचा राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनीही बाह्या सरसावलेल्या दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला
टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला हवा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील,
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीस प्रारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे प्रारंभ झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब
राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी -२० शिखर परिषदेतील सहभाग अभिमानास्पद, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले
मोदी साहेब, जर आम्ही चुकीचे काम केले असेल तर खटला भरा – शरद पवार
देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि भोपाळला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, सर्व भ्रष्ट लोकं आहेत. अनेकांची माहिती आमच्याकडे आहे. माझं मोदी साहेबांना नम्रतेने सांगणे एकच आहे, जर या ठिकाणी कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याविरुद्ध तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही स्वतः काय
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरित होणार मुंबई : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर
शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जलसंधारण, जलसंपदा विभागांना निर्देश मुंबई : शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान-मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे निकष व मापदंड बदलण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या धोरणात्मक व लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने
ठाणे जिल्ह्यातील विकास कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत घेतला विविध यंत्रणांचा आढावा ठाणे : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत कार्यवाही पूर्ण करुन कामांना सुरुवात करावी, कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला हवीत, मात्र ही कामे

