बातम्या
पंतप्रधानांनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट
तेल अवीव, दि. 26 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्झोग यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी 2017 मधील आपला इस्रायल दौरा आणि 2023 मधील दुबई दौऱ्याच्या वेळी राष्ट्रपती हर्झोग यांच्यासोबत झालेल्या मागील भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. भारत – इस्रायलमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले असून, ते आता शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी
पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट
जेरूसलेम (इस्रायल), 25 फेब्रुवारी : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला आज इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान भागीदारी हा भारत-इस्रायल द्विपक्षीय
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर
मुंबई, दि. 25 फेब्रुवारी : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, 25 जानेवारी, 2026, रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पंचायत प्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सन 2024-25 वर्षाकरिता पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध केली; या मध्ये पाचव्या अनुसूचीअंतर्गत येणाऱ्या व पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू असणाऱ्या राज्यांमध्ये पेसा कायद्याच्या प्रभावी
महाराष्ट्राला एआय करिता भविष्यसज्ज करण्याचा आमचा संकल्प : मुख्यमंत्री
कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र! मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत
शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प ! मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या
ईर्जिकच्या शिरपेचात मानाचा तुरा!; आंबा व्यवसायासाठी ‘अमृत’ महाराष्ट्रसोबत हातमिळवणी
ईर्जिक (EERGIC) फाउंडेशन आणि अमृत (AMRUT) महाराष्ट्र शासन उपक्रम यांच्यात सामंजस्य करार; आंबा क्षेत्रात नव्या उद्योजकांची फळी घडवणार! पुणे, दि. 20 फेब्रुवारी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बळ देणाऱ्या आणि गुणवत्ता पूरक उत्पादनांची चळवळ चालवणाऱ्या ‘ईर्जिक (EERGIC) फाउंडेशन’ ने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. आंबा व्यवसायातील तरुण उद्योजकांना चालना देण्यासाठी ईर्जिक फाउंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या ‘अमृत’ (AMRUT)
सकारात्मक विचारातून मिळणारी ऊर्जा तरुणांसाठी सर्वात मोठे भांडवल : शांताकुमारी
गाझियाबाद, दि. 22 फेब्रुवारी : स्वावलंबी, निर्भय,आत्मविश्वासू आणि चारित्र्यसंपन्न युवा हे कोणत्याही राष्ट्राची अमूल्य धरोहर असतात. तसेच ज्याच्यात उत्साह आणि विवेक यांचा समतोल आहे तोच खरा युवा आहे. सकारात्मक विचारातून मिळणारी ऊर्जा ही तरुणांसाठी सर्वात मोठी भांडवल असते. अशा व्यक्तींचा निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असे राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांनी म्हटले
संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा हरियाणामध्ये
संघशताब्दी निमित्त आगामी वर्षभराच्या नियोजनावर होणार मंथन नवी दिल्ली, दि. 24 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’चे आयोजन यावर्षी हरियाणातील समालखा येथे करण्यात आले आहे. 13, 14 आणि 15 मार्च 2026 रोजी पट्टीकल्याणा येथील ग्रामविकास आणि सेवा साधना केंद्रात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
नैसर्गिक आपत्तीग्रस्त आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार : नितेश राणे
मुंबई, दि. २० फेब्रुवारी : यावर्षी वातावरणातील बदलांमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यातील आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान आजपर्यंत कधीही झाले नाही. कोकणातील आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग
धर्मांतराविरोधातील ग्रामसभांचा निर्णय संवैधानिक, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
जनजाती परंपरांच्या संरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब जनजाती हितरक्षणासाठी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नांना बळ नाशिक, दि. 24 फेब्रुवारी : सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या निर्णयाचे जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले आहे. जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सचिव शरद केळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिग्बल

