दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे : डॉ. हिरेमठ

पुणे – दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने न पाहता सन्मानाने पाहिले जात आहे. दिव्यांगांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सन्मानाने स्वतःचा रोजगार करावा. तसेच इतरांनाही रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सक्षमचे पुणे महानगराचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच भावे प्रशालेत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. ते

Read More

‘भारत को जानो’ स्पर्धेतून भारताचे अंतरंग उलगडले : डॉ.विजय भटकर

२५ वी अखिल भारतीय ‘भारत को जानो’ स्पर्धा उत्साहात दि. ११ जानेवारी, पिंपरी चिंचवड : भारत विकास परिषद आयोजित अखिल भारतीय ‘भारत को जानो’ ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना भारताची विविधतेतील एकता व आपल्या महनीय भारताचे अंतरंग जाणून घेण्याची संधी आहे. भारतीय मूल्यांवर विश्वास ठेऊन, ध्येय ठरवून सातत्याने त्या दिशेने चालत राहिल्यास भारताचे सक्षम, संस्कारित

Read More

संघाने राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य केले : गजानन निमदेव

‘समर्पणाचा शतकोत्सव’ : विदर्भ हुंकारच्या संघ शताब्दी विशेषांकाचे प्रकाशन नागपूर, 28 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासात स्वयंसेवकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक सेवा, शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती या प्रत्येक क्षेत्रात संघकार्य प्रभावीपणे सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य संघाने केल्याचे

Read More

कराड येथे बंधुता परिषदेचे आयोजन

कराड, दि. ३१ डिसेंबर : दिनांक २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेस भेट दिली होती या ऐतिहासिक भेटीचे स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश समाजात रुजावा यासाठी त्याच ठिकाणी म्हणजे कराड शहरातील संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होणार जल्लोषात

अयोध्या, १३ डिसेंबर : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीनिमित्त अयोध्येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगद टीला येथे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राम कथा, अनुप जलोटा, सुरेश वाडकर आणि तृप्ती शाक्य यांचे भजन तसेच कथक नृत्य नाटक यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

Read More

‘एकशः सम्पत्’ पुस्तकाचे पुण्यात सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. ११ डिसेंबर : जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. प्रेरक लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी

Read More

महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : केंद्राचे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून राज्य नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती शक्य होत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी सांगितले की, नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांत नवीन पोलीस चौक्या उभारून

Read More

पुणे महानगरातील 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींची मंजुरी : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : पुणे महानगर क्षेत्रातील 220 विकास प्रकल्पांना 32 हजार 523 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरांना आवश्यक सुविधा देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते विकास आराखडा ठरवल्यानंतरच शहर विकासाची रुपरेषा अंतिम करावी, असेही त्यांनी सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

Read More

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभे राहणार

बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नागपूर, दि. ११ डिसेंबर : राज्याचा 720 किमी समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन 2026 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सभागृहातील बैठकीत दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि वरिष्ठ

Read More

शताब्दी वर्षात संघ सर्वस्पर्शी व्हावा : सहसरकार्यवाह अतुल लिमये

नागपूर : संघ शताब्दी वर्षात असून, संघ कार्याची आगामी दिशा काय? तर संघ सर्वस्पर्शी झाला पाहिजे, या दृष्टीने कार्य करायचे आहे. व्यक्तीनिर्माण एका दिवसात होत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संघाच्या दृष्टीने वातावरण अनुकुल आहे, पण समाज परिवर्तनासाठी आचरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. आचरण सुधारत नाही, तोपर्यंत परिवर्तन स्थायी

Read More