बातम्या
तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प – महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तौरल इंडिया-सुपा प्लांट’चे भव्य उदघाटन पारनेर (अहिल्यानगर), दि. 8 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे ‘तौरल इंडिया-सुपा प्लांटचे’ उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन
‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक ब्रँड बनविणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद; वेलनेस, स्टार्टअप्स व जागतिक गुंतवणुकीचा संगम मुंबई. दि. ५ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक
आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नये : एकनाथ शिंदे
सोलापूर जिल्ह्यातील सभेत एकनाथ शिंदेंची गर्जना वळसंग (जि. सोलापूर), दि. ४ फेब्रुवारी : इथे कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये. कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. जिल्हा
स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा : फडणवीस
हरिद्वार, दि. ४ फेब्रुवारी : स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांच्या कार्याचा गौरव केला. फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते.
दादा लाड, भारतभूषणदास महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर
पुणे, ४ फेब्रुवारी : शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा.
महायुती सरकारचे लोकहितकारी निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा : रवींद्र चव्हाण
सातारा, दि. २ फेब्रुवारी : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कराड येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षातर्फे आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. मोदी सरकारने आणि भाजपा-महायुती सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, राज्यातील १३९ बस फेऱ्या रद्द
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६
पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली. पुणे शहर व परिसरातील वेगवान औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि गुंतवणूक आकर्षण लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) कालमर्यादेत भूसंपादन, निधी
राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. राज्यात पायाभूत सुविधा तसेच
हरित महाराष्ट्रासाठी येत्या ५ वर्षांत राज्यात लावले जाणार ३00 कोटी वृक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र प्राधिकरणा’च्या स्थापने संदर्भात बैठक पार पडली मुंबई, दि. २ फेब्रुवारी : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात

