बातम्या
ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान
नवी दिल्ली, २६ जून : ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी त्यांचे नाव सुचवले. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची या पदासाठी निवड झाली. शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
अक्कलकोट, दि. २४ जून : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशात आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
अरुणाचल प्रदेश: इटानगरमध्ये ढगफुटी, घरे आणि वाहनांचे नुकसान झाले
ढगफुटीमुळे अरुणाचल प्रदेशच्या इटानगर शहरातील अनेक भागात रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामुळे असंख्य घरे व वाहने खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेशच्या राजधानीचे शहर असलेल्या इटानगरमध्ये भूस्खलनाच्या घटनांमुळे वाहने आणि निवासी परिसर प्रभावित झाला आहे. विपरीत हवामान परिस्थितीमध्ये स्थानिक रहिवाशांना जागरूक आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. अधिकारी
विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २२ जून पासून पुण्यात होणार : विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे
पुणे, ता. २० : भारतीय विज्ञानाबद्दल जनजागृती घडवून आणणाऱ्या विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार व रविवारी (दि. २२ व २३ जून २०२४) पुण्यात लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी कॅम्पसमध्ये होणार आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी विज्ञान भारतीचे महासचिव प्रा. सुरेश
राज्यसभा पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा उमेदवार राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज हा अर्ज दाखल करत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात : प्रविण पुरी
सक्षमच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप पुणे : देशात २०१६ मध्ये दिव्यांगांसाठी कायदा येण्यापूर्वी पुण्यातील विविध सेवा संस्था काम करत होत्या, त्यातूनच महाराष्ट्रात निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे देशातील पहिले मंत्रालय आहे. आता इतर देशही त्याचे अनुकरण करत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले. समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’)
हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय : प्रा. सुरेश (नाना) जाधव
पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोलापूर : हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक प्रा.सुरेश (नाना) जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभात केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी हरिभाई देवकरण
भारतीय संस्कृतीचा पाया असणारी कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे : ॲड. रोहित सर्वज्ञ
नांदेड, 8 मे 2024 : राष्ट्रीय संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असणारी एकत्रित कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन असणारे विमर्श प्रस्थापित करून हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. चुकीचे विमर्श समाजावर थोपविले जात आहेत. त्यामुळे समाजातील प्रज्ञावंतांनी अभ्यासपूर्वक प्रकट व्हायला हवे. चुकीचे तात्विक,सैद्धांतिक
सशक्त बीजरोपणाने संघ आणि संघाचे विचार वाढले : भैय्याजी जोशी
नाशिक : स्व. नाना ढोबळे यांनी सशक्त बीजे रोवली म्हणून संघकार्य दुर्गम आदिवासी भागात पोहचले. नानांनी जे सशक्त बीजरोपण केले आहे, त्यामुळेच संघ आणि संघाचे विचार अजून वाढले. रा. स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व.नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकतेच शंकराचार्य संकुलाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात राष्ट्रीय स्वयंसेवक
धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्यांचे रक्षण करणे म्हणजेच राष्ट्रकार्य : भैय्याजी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या सेविकांना मार्गदर्शन नाशिक : धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्य यांचे रक्षण करणे महणजेच राष्ट्रकार्य होय. “रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग” असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.त्यामुळे आपण कठोर बनून थोडा वेळ हा राष्ट्रकार्यासाठी राखून ठेवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी येथे केले. राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसाठी

