राष्ट्रीय
G-20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G-20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या
भारत मंडपम येथील नटराज पुतळा भारताची प्राचीन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक्सवर प्रसारित केलेली पोस्ट शेअर करून पंतप्रधानांनी म्हटले आहे: “भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची महती प्रदर्शित करतो. G20 परिषदेसाठी जगभरातले नेते इथे एकत्र येत
नवयुवकांना सैन्य दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे : मिलिंद वाईकर
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पुणे महानगरतर्फे पुण्यात वीर नारी, वीर पत्नी व वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन पुणे : “वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पुण्यात
पुणे – दि. 4 सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. तीन दिवसांची ही समन्वय बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. या बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय
भारतीय भू-भागावर दावा सांगणारा चीननं प्रकाशित केलेला नकाशा भारतानं फेटाळला
भारताच्या हद्दीवर दावा सांगणारा नकाशा चीननं प्रसिद्ध केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. असे दावे केल्यानं कुठलाही भुभाग एखाद्या देशाचा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. चीनला असे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. चीननं नकाशात दाखवलेला भारताचा भुभाग हा भारताचाच असल्याचं त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

