राष्ट्रीय
ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लोकसभेत मंजूर
अनेक दशके प्रलंबित असलेले विधेयक ४५४ विरुद्ध २ मतांनी पारित गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षणाची तरतूद या विधेयकात आहे. काल नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या भाषणातून सूचित केल्यानंतर केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल
आपल्या लोकशाहीचे यश हे “आम्ही भारताचे लोक” चा सामूहिक, एकत्रित प्रयत्न आहे – उपराष्ट्रपती
खुली आणि मोकळी चर्चा हे फुलणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य – उपराष्ट्रपती रणनीती म्हणून व्यत्यय आणि अडथळ्यांचा शस्त्रास्त्र म्हणून वापर करण्याचे जनता कधीच समर्थन करणार नाही – उपराष्ट्रपती संविधान सभेत तीन वर्षे चाललेल्या चर्चेने सभ्यता आणि खुल्या चर्चेचे उदाहरण घालून दिले – उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे महत्त्व सांगितले
“जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे भारतावर दायित्व”: डॉ. मोहन जी भागवत
अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सिम्बॉयोसिस विश्वभवन
“समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार” – डॉ. मनमोहनजी वैद्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठक समारोपप्रसंगी सहसरकार्यवाहांनी दिली माहिती समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीचा समारोप
काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीकडून पुन्हा एकदा माध्यमांची गळचेपी, ‘प्रश्न विचारणाऱ्या’ पत्रकार-संपादकांवर बहिष्कार
माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने नेहमी गळे काढणाऱ्या… मोदी-शाहांना हिटलर, हुकुमशाह म्हणणाऱ्या… उजव्या विचारसरणीच्या लोकांना प्रश्न नको असतात असा आरोप करणाऱ्या… सर्व डाव्या, तथाकथित पुरोगामी पक्ष आज पत्रकार-संपादकांची यादी जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आहे. इंडी आघाडीची बैठक काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झाली. त्यानंतर सर्व पक्षांद्वारे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी ९ वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस ३६ संघटनांचे एकूण २६७ प्रमुख पदाधिकारी उपस्थित असून त्यातील ३० महिला आहेत. बैठकीस उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ.
‘आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी केला ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा प्रारंभ
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आयुष्मान भव हा एक मोठा उपक्रम म्हणून उदयास येईल. : डॉ. मांडविया भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी मोहिम आयुष्मान भव आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ही मोहिम तसेच आयुष्मान भव पोर्टलचा शुभारंभ केला. गुजरातमधील गांधीनगर येथील राजभवन येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत त्यांनी ही मोहिम सुरू केली. यावेळी राष्ट्रपतींसोबत केंद्रीय आरोग्य
संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा – सुनील आंबेकर
सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश पुणे, दि. १३ सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची
स्वामीजींचा कालातीत संदेश म्हणजे मार्गदर्शन करणारा प्रकाशस्तंभच
स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिकागो येथे केलेल्या भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 130 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म संसदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण आजदेखील जागतिक एकात्मता आणि सौहार्द राखण्यासाठीचे आवाहन म्हणून ध्वनित होत आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले: “स्वामी विवेकानंद

