आंतरराष्ट्रीय
G-20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G-20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या
नवी दिल्ली घोषणापत्रावर सर्वसहमती ही ऐतिहासिक उपलब्धी : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली घोषणापत्र (लिडर्स डिक्लेरेशन) स्वीकारल्याबद्दल जागतिक नेत्यांची प्रशंसा केली आहे आणि जी-20 च्या सर्व सहकारी सदस्यांचे समर्थन आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली घोषणेची डिजिटल प्रत शेअर करताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये लिहिले की: “नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारून इतिहास रचला गेला आहे. सर्वसहमती आणि भावनेने, एकजुटीने, आम्ही चांगल्या, अधिक
यंदाचा शिवप्रतापदिन खास … शिवप्रेमींना घडणार छत्रपतींच्या वाघनखांचे दर्शन
शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात येणार, शिवप्रतापदिनी घेता येणार दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा ज्या वाघनखांनी वध केला ती वाघनखे ब्रिटिश प्रशासनाने भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष सुरू आहे. त्यामुळे अशा प्रसंगी ही प्रेरणादायी वाघनखे महाराष्ट्रात येणे हे विशेष महत्त्वाचे
एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे. म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी भाषण केले त्यावेळी

